Tuesday, January 31, 2012

किती कठीण असतं....!

किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .

किती कठीण असतं
... हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..

किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..

किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं...........!!!  

No comments:

Post a Comment