नेहमीच्या वाटेवरून जाताना अवचित तू भेटशील
"कसा आहेस रे तू ...?"असे हळूच विचारशील
पाणावलेल्या डोळ्यांनी मी किंचित हसेल अन सांगेल "मी ठीक आहे..आणि तू ..?"
तुझ्याही गालावरून मग पाणी ओघळेल "मी पण ..." असे बोलून तू ते टिपून घेशील....
'आठवतंय का तुला ...' असं बोलून मग गप्पांना सुरुवात होईल
... ... जुने क्षण पुन्हा नव्याने तू उलगडशील...
नेहमीसारखी तू अखंड बडबड करणार नाहीस
अन मी हि नेहमीसारखा तुला गप्प बसवणार नाही
कारण तो प्रत्येक क्षण मला साठवून ठेवायचा असेल
कारण पुन्हा ऐकायला कदाचित मी हि नसेन ........
एखादा क्षण मनसोक्त हसवेल तर एखादा डोळेभरून रडवेन
"काही नाही ग हसून हसून डोळ्यात पाणी आलं" असं म्हणून मी गप्प बसेन.....
थोडा वेळ गप्प राहुन 'मग ...अजून काय ..?" असं विचारशील
मी काही बोलायच्या आतच "आता निघायला हवं" असं म्हणून तू जायला निघशील...
तुझ्या पावलांचं ते जाताना घुटमळणं मला टोचून जाईन
'पुन्हा कधी ..." वाक्य अर्धवटच राहून जाईन.........
सगळं काही असेल आपल्याकडे
पण आपण एकमेकांचे नसू ........
असतील फक्त तुझे नि माझे जपलेले ते आसू ....